रत्नागिरी : पुरामध्ये पूर्ण घर गेलेल्यांना दीड लाख रुपये, व्यापाऱ्यांना ५० हजार तर टपरीधारकांना १० हजार रुपये अशा प्रकारची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. या महापुरामध्ये चिपळुणातील संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. महापुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आदींसह अनेक नेत्यांनी पाहणी केली. व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र, मंगळवारी (दि.३) जाहीर झालेल्या पॅकेजबाबत येथील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत व्यापारी अरुण भोजने यांना विचारले असता, राज्य शासनाचे सर्व प्रतिनिधी व प्रशासन येथे येऊन पाहणी करून गेले, त्यांना नुकसानाची पूर्ण कल्पना आहे मात्र असे असताना व्यापार्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ५० हजारात कोणत्याही व्यापाऱ्याचा व्यवसाय उभा राहू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:31 PM 04/Aug/2021