कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

0

शेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे चिंताजनक होती. गेले दोन दिवसांत ती अधिक गंभीर झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नियोजनबद्ध कार्यपद्धती व शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंकरभाऊंच्या नेतृत्वात श्रीगजानन महाराज संस्थानचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे. त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे. राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला विकास आराखड्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन हे विकासाकरिता मैलाचा दगड ठरले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 05-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here