राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले…

0

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युतीबाबत आज चर्चा झाली नाही. आजची भेट राजकीय नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्यानं कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. नाशिकमध्ये झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मी अहंकार मानणारा नेता नाही. कुणी घरी ये म्हटल्यानंतर घरी जाणं ही परंपरा आहे. भेटीच्या आधी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की, युती झाली नाही तरी मैत्री राहील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here