मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा न घेता नव्या निषकांनुसार निकाल जाहीर केला होता. त्यानंतर इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. सरकारचा हा अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे.
विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच इयत्ता अकरावीसाठीचे प्रवेश द्यावेत, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत. कोर्टाच्या निकालावर आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अंतर्गत गुणांच्या निकालाच्या आधारावर प्रवेशक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, तसेच त्याचे नियोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणीही केली होती, तर काहींनी अभ्यासही सुरू केला होता. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाच्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा ही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येईल आणि प्रत्येकाला प्रवेश मिळेल”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 10-Aug-21