रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-पाडवेवाडी येथे नोटरी केलेल्या जागेच्या वाटेत चिऱ्यांची भिंत उभारुन रस्ता दडपशाही करून बंद केल्याप्रकरणी सुधीर विठ्ठल बालम (५३, रा. हनुमाननगर पडवेवाडी मिरजोळे, रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० ऑगस्ट २०२१ ते ११ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडली आहे. त्याच्याविरोधात अब्दल्ला अ. रहमान वस्ता (७४, रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार सुधीर बालमला रस्ता वापर करण्याकरिता संमत्ती दिलेल्या व अब्दुल्ला वस्ता यांच्या नोटरी केलेल्या जागेच्या वाटेत त्याने चिऱ्यांची भिंत उभारून वस्ता यांचा रस्ता दडपशाही करुन बंद केला. याबाबत अधिक तपास पोलिस हवालदार वीर करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 16-Aug-21