‘मरुद्या मुख्यमंत्री…’; सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओघात केलेल्या वक्तव्याची चर्चा

0

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका कामासंदर्भात निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ‘मरुद्या मुख्यमंत्री’ असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं. मात्र शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रय भरणे यांनी देखील तात्काळ दिलगिरी व्यक्त केली आहे.
सोलापूर महानगरपालिकातर्फे रविवारी माझी वसंधूरा अभियान अंतर्गत 20 हजार वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी या अभियानासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तेव्हा मनोगतावेळी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. पालकमंत्री आपले मनोगत संपवत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम दाखल झाल्या. त्यावेळी दत्तात्रय भऱणे यांनी त्यांना निधी उपलब्ध करुन द्यायचा का असा सवाल केला. तेव्हा महापौर यन्नम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागुया असे उत्तर दिले. तेव्हा बोलण्याच्या ओघात भरणे यांनी ‘मुख्यमंत्री मरु द्या. आपल्या आपण करु. मुख्यमंत्र्याकडून मोठा निधी मागू’ असे वक्तव्य केले. पालकमंत्र्यांनी ओघात केलेल्या वक्तव्याचे मात्र शिवसेनेकडून खरपूस समाचार घेतला जातोय. सोलापूरातील शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार निशाला साधला. तेव्हा दत्तात्रय भरणे यांनी या बद्दल स्पष्टीकरण दिलं. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले काम आहे. माझ्या वक्तव्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:18 PM 16-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here