वाडी जैतापूरसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी

0

खेड : तालुक्यातील वाडी जैतापूर, कामिनी व वाडी बेलदारसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे केली. दुर्गम भागात वसलेल्या या गावांना ५ ते १० कि.मी. पायपिट करून मांडवे व मौजे जैतापूर या मतदान केंद्रावर यावे लागते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही गावे गेली अनेक वर्षे पायपीट करुन आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. महिपतगडाच्या पायथ्याशी वाडी बेलदार हे गांव वसलेले आहे. या गावांना मांडवे व मौजे जैतापूर ही मतदान केंद्रे लांब आहेत. त्यांना वाडी जैतापूर या मध्यवर्ती ठिकाणी मतदान केंद्र मिळाल्यास सोईचे होणार आहे. मतदानासाठी डोंगर रस्त्यातून पायपीट करावी लागत असल्यामुळे वयोवृद्ध व दिव्यांगांना मतदानासारखा पवित्र हक्कापासून वंचित रहावे लागते. हा त्यांच्यावर अन्याय आहे. या मतदारांना सोईच्या ठिकाणी मतदान केंद्र मिळावे म्हणून आमदार योगेश कदम यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याजवळ चर्चा करुन निवडणूक आयोगाकडे याबाबत लेखी मागणी केलेली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 17-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here