रत्नागिरी : इंडियन कोस्टगार्डमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तब्बल १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी मुनाफ अब्दुल रज्जाक भाटकर (रा.भाट्ये, काटली, रत्नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात विशाल सुभाष गुरव (२९, रा.रामवाडी, वाकेड लांजा, रत्नागिरी) यांनी शनिवारी सायंकाळी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. ही घटना १७ सप्टेंबर २०१७ ते ६ सप्टेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे. त्यानुसार, संशयित मुनाफ भाटकर याने सन २०१७ ते २०१९ या कालावधीत विशाल आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर मुलांना इंडियन कोस्टगार्ड, रत्नागिरी येथे नाविक, जनरल ड्युटी, ड्रायव्हर ड्युटी करता नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकाकडून ५० हजार रूपये घेतले. परंतु पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विशालने शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. आतापर्यंत अंदाजे १२६ मुलांची फसवणूक करून संशयिताने त्यांच्याकडून एकूण ६५ लाख रुपये एवढी रक्कम घेऊन फसवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:06 PM 23-Aug-21