रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीत टीम पाठवली आहे. त्यामुळे ना. नारायण राणे यांनी न्यायालयात धाव घेत ट्रांजिस्ट अँटीसीपीटरी बेल साठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बिले यांनी फेटाळला आहे. रत्नागिरीतून नाशिकात जाताना अटक करू नये यासाठी हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मुळात राणेंचे वास्तव्य रत्नागिरीत नाही शिवाय नाशिकला जाण्यासाठी काही प्रोटेक्शन ची गरज नाही असे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
2:47 PM 24-Aug-21