मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांनी जुलै महिन्यातच नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यान, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची ही 20 वर्षातील पहिलीच वेळ आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘नारायण राणे यांच्या अटकेची बाब गंभीर आहे. नारायण राणेंनी काही शब्द वापरले असतील, ते टाळता आले असते. पण, महाराष्ट्रात 42 पैकी 27 असे मंत्री आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. पण, त्यांना अटक नाही. महाराष्ट्रात आज लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:30 PM 24-Aug-21