“मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत असतील तर, आता यावर राष्ट्रपती राजवट हाच उपाय”

0

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आल्याने काल राज्यात मोठा राजकीय राडा झाला होता. दरम्यान, नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या जुहू येथील निवासस्थानावर धडक दिली होती. या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शाबासकी दिली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमधून राज्यातील परिस्थिती पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, ”तर कालची घटना म्हणजे पश्चिम बंगालप्रमाणे राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचार होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांवर सुरक्षेची जबाबदारी असते. मात्र इथे मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. आता अशा ठकांपासून सुरक्षिततेसाठी एकच उपाय आहे तो म्हणजे राष्ट्रपती राजवट”, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:12 PM 25-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here