मुंबई : निसर्गाच्या अवकृपेनंतर तळई गावातील व आजूबाजूच्या पाड्यातील अशा एकूण २६१ घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर सोपविली असून, हा पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तळई गावातील ६३ कुटुंबांसाठी घरांची उभारणी येत्या दिवाळीपर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात आजूबाजूच्या पाड्यातील कुटुंबीयांसाठी घरांची उभारणी केली जाणार आहे. या घरांची उभारणी मार्च २०२२ पर्यंत करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे, असं आव्हाड यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 25-Aug-21