वरवेली : रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरू केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील, असा इशारा भाजपचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात विविध पडसाद उमटत आहेत, यावर नातू म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पक्षांचे राजकीय नेते यापूर्वी काही अलिखित संकेत पाळत होते. त्यामुळे जिल्ह्याची एक वेगळी राजकीय संस्कृती होती. अनेकवेळा आंदोलने झाली, विषय झाले, निर्णय झाले, प्रसिद्धीही झाली. त्यानंतर त्या त्या गटांनी विजयोत्सव, निषेध आदी व्यक्त केले. यावेळी पोस्टर फाडणे हा नवीन उपक्रम शिवसेनेने सुरू केला. पोलिस संरक्षणात शिवसेनेचे एक आमदारच कार्यकर्त्यांबरोबर पोस्टर फाडताना दिसले. शिवसेनेचेही पोस्टर लागतात. तेही कसे राहतील? या पुढच्या काळात त्याचा विचार करावा लागेल, असे डॉ. नातू म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 30-Aug-21