महाराष्ट्रात नाइट कर्फ्यू लागणार? राजेश टोपे यांचे मोठे संकेत

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमालीचे वाढताना पाहायला मिळत आहे. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळनंतर महाराष्ट्रात रुग्णवाढ आढळून आली असून, केंद्र सरकारने राज्य सरकारांना याबाबत काही सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर असून, करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. केरळ व महाराष्ट्राने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे राजेश टोपे यांनी नमूद केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 30-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here