गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहतूक नियमांचा भंग करणार्या १४५८ वाहनचालकांना १ कोटी २० लाख ५७ हजार रु.च्या दंडासह थकित वाहन कर असे एकूण २ कोटी ५८ लाख ६३ हजार रु. ची वसूली करण्यात आली आहे. विविध कलमांखाली वाहनचालकांवर कारवाई करून दंड करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने हि कारवाई केली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या महसूलात वाढ झाली आहे.
