टीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

0

रत्नागिरी : राज्यात प्राथमिक शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबरला टीईटी घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यास २५ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. मात्र, अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आल्याने परीक्षा परिषदेने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषाणू संसर्गामुळे टीईटी लांबणीवर पडली होती. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गाच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण ही अनिवार्य पात्रता करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचा टीईटीकडे ओढा असतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा व टीईटी परीक्षा एकाच दिवशी १० ऑक्टोबरला होणार असल्याने टीईटीची तारीख बदलण्याची मागणी यापूर्वीच परीक्षा परिषदेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात प्राथमिक शिक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना दि. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 31-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here