रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचे बेशिस्त पार्किंग केले जात आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. अशातच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने होणाऱ्या वाहनांच्या गर्दीने प्रवाशांना वाट काढणे कठीण होत आहे. शहरातील बेशिस्त जाणाऱ्या वाहनांमुळे व पार्किंगमुळे वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांना रस्ता ओलांडण्यासाठी जोखीम पत्करावी लागत आहे. पोलिसांनी या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरात मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसलेले फेरीवाले आणि बेशिस्तपणे रस्त्यावर उलट सुलट पार्किंग करून वाहतूक कोंडी करत आहेत. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 01-Sep-21