‘रनप’कडून घरपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम हाती

0

रत्नागिरी : दीड वर्षाच्या कोरोना काळाने घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हान येथील नगर परिषदेसमोर आहे. १४ कोटी उद्दिष्ट असताना फक्त ८ कोटी वसूल झाले, तर ६ कोटी थकीत आहेत. थकबाकी वसुलीसाठी पालिकेने जादा कर्मचारी कामाला लावून साडेचौदा हजार इमलेधारकांना घरपट्टीची मागणी बिले देण्याची मोहीम हाती घेतली. आहे. दरदिवशी ५०० घरांना नोटीस बजावण्याचे, चिकटवण्याचे टार्गेट या कर्मचाऱ्यांना न.प. प्रशासनाने दिले आहे.

न.प.ला मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हान आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाची घरपट्टी वसुलीची मोहीम सुरू आहे; मात्र वर्ष संपायला आले तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनामुळे घरपट्टीचे उद्दिष्ट वाढून १४ कोटी झाले आहे. त्यापैकी ८ कोटी वसूल झाले असून ६ कोटी थकीत आहेत. अनेकांना थकीत घरपट्टीची मागणी विले मिळालेली नाहीत. प्रत्यक्ष नोटीस गेल्यास वसुलीला प्रतिसाद मिळण्याच्या शक्यतेने नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी मालमत्ता विभागाला कामाला लावले आहे. सहा कोटींची थकबाकी असली तरी थकीत इमलेधारकांना घरपट्टीची मागणी बिले देऊन त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. त्यासाठी मालमत्ता विभाग आणि शिपाई यांच्यामार्फत नोटीस बजावण्यात किंवा चिकटवण्यात येणार आहे. इमलेधारकांनी वेळीच थकीत घरपट्टी न भरल्यास जप्तीसारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला. शहरातील संचयनीसह अनेक बुडीत निघालेल्या कंपन्यांची एक कोटीची थकबाकी आहे. मालमत्ता विभाग आणि १४ शिपायांपैकी ८ जण शहरातील साडेचौदा हजार इमलेधारकांना घरपट्टी मागणी बिले देण्यासाठी कामाला लागले आहेत. उर्वरित वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ऑनलाईन घरपट्टी नागरिकांनी भरावी, असेही आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:07 PM 02-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here