लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने असे केले आहे. वासू यांचे सोमवारी (30 ऑगस्ट) मुंबई येथे निधन झाले.
पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने चौथा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे.
कोण होते वासु परांजपे?
भारतीय संघाला मुंबईने अनेक हिरे दिले. यात सुनिल गावस्करांपासून तेंडुलकर ते आता रोहित शर्मा अशा अनेकांचा समावेश आहे. यातीलच एक सर्वात जुने खेळाडू म्हणजे वासु परांजपे. मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावं सामिल आहेत. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासु यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 02-Sep-21