टोकियो : टोकियोमध्ये सध्या सुरु असलेल्या 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिंपिक्स मध्ये भारतानं 12वं पदक जिंकलं आहे. हे पदक भारताला मिळवून दिलं आहे ते अवनी लेखरानं. अवनीनं 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. अवनीनं या स्पर्धेत हे दुसरं पदक जिंकलं आहे. याआधी तिनं याच स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:28 AM 03-Sep-21