केंद्र सरकारनंच काळजी घेण्यास सांगितलंय; भाजप नेत्यांनी माहिती करून घ्यावं : अजित पवार

0

पुणे : मंदिरं उघडण्याबाबत राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत. कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. पण मंदिरांचा विचार का केला जात नाही. असा सवाल इतर राजकीय पक्ष उपस्थित करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारकडे मंदिरत उघडण्याबाबत मागणीही केलीय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, सध्या राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल. ‘केंद्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशी त्यांनी सांगितलंय. आम्हालाही नागरिकांच्या भावनांचा आदर आहे. सध्या राज्यात मंदिर उघडण्याबाबत भाजप आंदोलन करतं आहे. त्यांनी केंद्राने दिलेल्या सूचनांची माहिती करून घ्यावी’, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:00 PM 03-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here