रत्नागिरी : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकूल योजनासाठी ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांनी नागरिकांना हक्काच्या घरकुलासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या योजनेत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन प्राधान्याने भूमिहीन लाभार्थ्यांना घरकूलसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव, गायरन जमीनही सार्वजनिक हितासाठी प्राप्त करुन त्यावरही नागरिकांना घरकुले उपलब्ध करण्याचे प्रस्ताव गरजू प्रत्येक नागरिकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अभियनात स्वयंसेवी ससंथा, ग्रामपंचायती आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी प्रोत्साहित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 03-Sep-21