साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने लढा उभारण्यात आला. या लढ्यातून येथे स्थानक उभारण्यात आले. मात्र, कोरोना काळात पॅसेंजर बंद असल्याने या स्थानकावर प्रत्यक्षात पॅसेंजर थांबण्याचे येथील जनतेचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. मात्र, आता दि. ७ सप्टेंबर रोजी या स्थानकावर पहिली पॅसेंजर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यामुळे ऐन गणपती हंगामात येथील जनतेला दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 07-Sep-21