‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. तिच्या अंमलबजावणीकडे राज्याचेच नाही, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करीत नाही, तर त्यांचे आशीर्वाद घेत आहोत. तेव्हा ही योजना शेतकऱ्यांच्या योग्य सन्मानानेच राबवा. कर्जमुक्ती योजनेची 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.