मुंबई : साकीनाका अत्याचार घटनेत मृत्यूशी झुंजत असलेल्या निर्भयाचा अखेर मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा अशा आशयाचं पत्र राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्या म्हणतात की, “साकीनाका अत्याचार पीडितेचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. पोलीस सर्व आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. या घटनेची सो मोटो दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मुंबईच्या पोलीस आयुक्ताकडे करण्यात येत आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांना लागेल ती मदतही पुरवण्यात यावी अशीही विनंती करण्यात येत आहे.”
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 11-Sep-21