रत्नागिरी : गणेश चतुर्थी सणाला मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची परतीची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) दि. १५ सप्टेंबरपासून मुंबई व पुणे मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहे. गावातील प्रवाशांनी तालुक्याच्या आगार प्रमुखांकडे ग्रुप बुकिंगसाठी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी सुनील भोकरे यांनी केले आहे. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मुंबई व पुण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज झाली आहे. दररोज एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. परतीच्या विशेष सुविधा देण्यात येणार आहे. गावातील ग्रामस्थांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांच्या गावातच थेट एसटी पाठवण्यात येणार आहे. गावातील चाकरमान्यांनी एसटीच्या ग्रुप बुकिंगसाठी त्या तालुक्याच्या आगार प्रमुखांकडे संपर्क साधावा, असे आवाहनही भोकरे यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 12-Sep-21