सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या दिशेने जात असताना कणकवली नजीक वागदे येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या संरक्षक कठड्याला आदळून झालेल्या अपघातात कार मधील तीन जण किरकोळ जखमी झाले.
हा अपघात रविवारी सकाळी १० वा च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर वागदेत टेंबवाडी येथे झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ बबलू गावडे, सचिन गावडे आदिनी घटनास्थळी धाव घेत जखमीना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत हे उपजिल्हा रुग्णालयात जात त्यांनी जखमींची विचारपुस केली. या अपघातात कारचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने कार खाली कोसळली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:04 PM 13-Sep-21