रत्नागिरी : पाली दूरध्वनी केंद्राच्या अखत्यारितील पाली, वळके, कापडगाव, पाथरट, साठरेबांबर, कशेळी, खानू, मठ, निवसर या गावातील दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्याने अडचणी येत आहेत. त्याचबरोबर गेले दोन आठवडे तर सातत्याने ही सेवा ठप्प झालेली आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडे तक्रार केली असता चौपदरीकरणामुळे ऑप्टिकल केबल तुटल्याचे उत्तर देण्यात येते. या भागात बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ऑनलाईन काम करणारे, बँका, तसेच ऑनलाईन शिक्षक घेणारे विद्यार्थी यांना फटका बसत आहे. त्यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 14-Sep-21