विराटनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार?

0

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. आता कर्णधार विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कर्णधार पदाची धुरा कोणाकडे जाणार या विषयी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचे नाव कर्णधारपदासाठी समोर येत आहे. मात्र राजीनाम्यानंतर ऋषभ पंथच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला टी-20 चे कर्णधारपद मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण विराट कोहलीनंतर क्रिकेटच्या वर्तुळात रोहित शर्माचे नाव समोर येत आहे. कर्णधार पदामुळे कोहली आणि रोहितमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या आल्या होत्या परंतु त्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत दोन्ही खेळाडूंनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत टी20 इंटरनॅशनलमध्ये 19 सामन्यांपैकी 14 सामने जिंकले आहे.

ऋषभ पंतला टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत रोहित शर्माचे नाव जरी पुढे असले तरी ऋषभ पंत देखील या शर्यतीत आहे. ऋषभ पंतने सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्सचे नेतृत्त्व करत आहे.

टी20 इंटरनॅशनलमध्ये विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने 45 सामने खेळले आहेत. त्यापैकी 29 सामन्यात भारत जिंकला आहे तर 14 सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. हारला तर दोन सामने अनिर्णयीत होते

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:57 AM 17-Sep-21


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here