रत्नागिरी : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचेकडून शासनाकडे मागील 3 ते 4 वर्षापासून विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. सदर मागण्या खालीलप्रमाणे:
- नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करणे.
- पदोन्नतीची कार्यवाही पुर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे.
- विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे.
- कोवीड-१९ मुळे मयत झालेले विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे कुटूंबियांना तात्काळ ५० लाखाची मदत देणे व कुटूंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घेणे.
- मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरणे.
- स्विय प्रपंची लेख्यातील रक्कम विभागातील कार्यालयांच्या व जनतेच्या सुविधेकरीता वापरणे.
- तुकडेबंदी तसेच रेरा कायद्यान्वये नोंदणी विभागतील अधिकारी/कर्मचारी यांचेवर करण्यांत आलेल्या कार्यवाह्या मागे घेणे.
- हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाचे पुरविणे.
- आय-सरिता, ई-फेरफार तसेच इतर सर्व्हरच्या अडचणी तात्काळ दुर करणे.
- आयकर विभागाकडील विवरण पत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी करण्यांत आलेल्या माहिती केंद्रीय सर्व्हरवरून पुरविणे.
- नोंदणी अधिकारी यांचेविरुध्द विनाकारण दाखल होणारे गुन्हे मागे घेणे.
- नविन आकृतीबंधानुसार शिपाई संवर्गातील पदे निरसित न करता कायम ठेवणे.
- निनावी व त्रयस्थ व्यक्तीव्दारे होणाऱ्या तक्रारीचे आधारे कार्यवाही प्रस्तावित न करणे.
- सह दुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाचे एकत्रीकरण करणे.
- पदनामामध्ये बदल करणे.
- विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घेणे.
- खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घेणे.
- विभागीय चौकशीची कार्यवाही विहीत मुदतीत पार पाडणे.
- सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल दरवर्षी विहीत मुदतीत प्राप्त करुन घेवून अद्यावत ठेवणे.
- शासन निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही करतांना त्या वर्षी रिक्त असलेली पदे त्याच वर्षात
भरणे. - बदल्या करतांना संघटनेस विचारात घेणे.
इत्यादी मागण्याबाबत तसेच शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
सदरच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापुर्वीच घोषीत केल्याप्रमाणे दि. 21.09.2021 पासून बेमुदत संप पुकारण्याचा निश्चय केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:29 PM 17-Sep-21