रत्नागिरी : निवळी आंबेडबुद्रुक येथे ट्रक वरील चार कामगारांनी २ लाख ४४ हजार ३४४ रुपयांचे सामान चोरल्याची तक्रार ट्रक मालक आशतोष रामसनेही राज, रा. कंकरबाग रोड. पटना याने संगमेश्वर पोलिसात दिली आहे. चारही संशयित आरोपी हे उत्तर प्रदेश मधील आहेत. सदराचा ट्रक जयगड येथून कोळसा भरून चिपळूण येथे खाली करण्यासाठी गेलेला असताना संशयित आरोपींनी ट्रक व डम्परचे समान चोरून नेले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याबाबत ४ जणांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक झावरे अधिक तपास करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:02 PM 18/Sep/2021