ब्रेकिंग : राजापूर येथे तीन नेपाळी कामगारांच्या मृत्यूने उडाली खळबळ

0

रत्नागिरी : राजापूर दळे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. हे तीन मृत्यू नेमके कशामुळे झाले? मद्य सेवनाने? की विषबाधेने याबाबतचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे. राजापूर येथील सलीम काझी यांच्या आंबा बागेत ही घटना घडली आहे. काल यातील एक कामगार रत्नागिरीहून परतल्यावर उलट्या करू लागला असता त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवले मात्र रात्रीच्या सुमारास या कामगाराचा मृत्यू झाला. लागोपाठ आणखी दोन कामगारांची देखील तब्येत बिघडल्याने त्यांना देखील उपचारासाठी इस्पितळात हलवण्यात आले. मात्र एकामागोमाग एका कामगाराचा मृत्यू झाला. आता या तीनही कामगारांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असून या तिघांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:12 PM 20-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here