रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा, दावे केले जात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणातील रिफायनरीसाठी सकारात्मक असल्याचा दावा देखील केला जात आहे. याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचा अद्यापही हिरवा कंदिल मिळालेला नाही. उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबिय रिफायनरी प्रकल्पासाठी सकारात्मक असल्याच्या चर्चा केवळ निराधार आहेत, असं राऊतांनी सांगितलं. खा. विनायक राऊत म्हणाले की, केवळ काही लोकांकडून त्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीनं वापर सुरू असल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. रिफायनरीबाबत समर्थक आणि विरोधक यांचं म्हणणं मी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवले आहे. पण, त्यावर त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे रिफायनरासाठी आग्रही आहेत या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचं खा. विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 20-Sep-21