राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

रत्नागिरी : पोलिस विभागातील राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना सोमवारी सकाळी ५.१५ वा. हृदयविकाराने मृत्यू झाला. गजानन जयवंत साळवी (५५,सध्या रा.पोलिस लाईन फगरवठार मूळ रा. फणसोप, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गजानन साळवी हे गुप्त वार्ता विभागात कार्यरत होते. सोमवारी सकाळी ५ वा. ते रिपोर्ट पाठवण्यासाठी ऑफीसला गेले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते हॉस्पिटलला गेले. त्यानंतर घरी गेले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालया दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here