कोरोना काळात उल्लंघन केल्याप्रकरणी दीडशे तबलिगींवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथे कोरोना काळात तबलिग समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करुन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२५ ते १५० जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार २० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वा. कालावधीत करण्यात आली. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश अरविंद कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार,सोमवारी सकाळी मिरकरवाडा येथील पांगरी मोहल्ला येथे कोरोना काळात तबलिक समाजाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १२५ ते १५० जण एकत्र आल्याने त्यांनी कोरोना काळातील शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस फौजदार अशोक राठोड करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here