नाशिक : ‘शरियत सारखा कायदा आणा. मगच बलात्कार थांबतील,’ असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष संघटनेत अनेक फेरबदल केले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना वाढत्या महिला अत्याचारांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा राज म्हणाले की, ‘महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला आपली व्यवस्था कारणीभूत आहे. कोणाला कायद्याचा धाक नाही. कोणाला कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळं शरियत सारखा कायदा आणा. मगच महिलांवर अत्याचार थांबतील. लोकांमध्ये कायद्याचा धाक आणि भीती निर्माण होईल,’ असं ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:56 PM 23-Sep-21