परभणी : आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा येत्या 25 आणि 26 सप्टेंबर तारखेला होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रवेशपत्रावर तसे नमूद करण्यात आहे. या भरती प्रक्रियेतील गोंधळावर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही तांत्रिक चुकी आहे परंतु आपण दुरुस्तीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं प्रवेशपत्र मेलवर देखील पाठवलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर उत्तर प्रदेश सेंटर ही तांत्रिक चूक आहे. पण बहुतेक सदर सर्व्हर उत्तर प्रदेशात वापरले गेले असावे, म्हणून असा प्रकार झाला असावा, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 24-Sep-21