राज्यात पुढील पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस

0

मुंबई : राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. सप्टेंबर संपत असताना पाऊस संपूर्ण राज्यात धुमशान घालणार आहे. हवामान खात्याने याबाबत नवीन अपडेट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवसांत सर्वत्र गडगडाटासहीत पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा अंदाज वर्तवून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने गेल्या आठवड्यात म्हटले होते की,’सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. विदर्भात जोरदार पाऊस होईल. त्यानंतर हा पाऊस राज्याच्या उत्तरेकडील बहुतेक भागाला व्यापून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार सध्या विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. पावसाने नागपूरला सर्वाधिक तडाखा दिला आहे. त्यात आता पुढील चार ते पाच दिवसांत पासचा जोर आणखी वाढू शकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचीही धास्ती वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील प्रशासन सतर्क राहिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:19 PM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here