मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाची शनिवारी आणि रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे ऐनवेळी ही परीक्षा रद्द करावी लागली. अचानक झालेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मंत्री टोपे यांनी माफी मागितली आहे. राज्यात आज, शनिवारी आणि रविवारी (26 सप्टेंबर) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आले आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गैररसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:13 AM 25-Sep-21