रत्नागिरी : सहकारी गृहनिर्माण संस्थांनी (सोसायट्या) वार्षिक सर्वसाधारण सभा दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) ३० सप्टेंबरपर्यंत घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सोसायट्यांचे लेखापरीक्षण अहवाल तयार झालेले नाहीत. त्यामुळे येत्या आठवडाभरात लेखापरीक्षण अहवाल तयार करून वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घेण्याचे आव्हान उभे राहिल्याने सोसायट्यांपुढे या प्रक्रियेचा पेच निर्माण झाला आहे. सहकारी सोसायट्यांना ३० सप्टेंबरपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यापूर्वी वेळोवेळी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लेखापरीक्षण अहवाल तयार करण्यास मुदतवाढ दिली होती. राज्य सरकारने ३ सप्टेंबर रोजी शुद्धीपत्रक काढून वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी आता आयत्यावेळी लेखापरीक्षण अहवाल कसा तयार करायचा, असा मोठा पेच सोसायट्यांपुढे उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभा डिसेंबरपर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्याची मागणी महासंघाने केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 25-Sep-21