गुलाब चक्रीवादळाबाबत महत्त्वाचे अपडेट…

0

◼️ चक्रीवादळाचा जोर ओसरला; मात्र महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : बंगालच्या उपसागरावर घोंघावणाऱ्या गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. हे वादळ दक्षिण ओरिसा आणि आंध्रमध्ये लँडफॉल झाले. या वादळाची तीव्रता कमी होऊन त्याठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मात्र चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईसह कोकण, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुत्ते यांनी ही माहिती देत चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट जारी केला आहे. त्यांनी या अनुषंगाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. मच्छिमारांनी या तीन दिवसांत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे विशेष आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:18 PM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here