नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत देशातील कोट्यवधी मुलांना 5 वर्षे मोफत अन्न दिले जाणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या योजनेची माहिती दिली. ही योजना शिक्षण विभागाशी संबंधित आहे आणि या देशातील गरीब कुटुंबातून आलेल्या करोडो मुलांना पोषण योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी सरकारने अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही घेतलाय. सरकारी शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांसाठी ही योजना सुरू केली जाईल. त्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे ठेवण्यात आले. शासकीय शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच या योजनेचा लाभ शासकीय अनुदानित शाळांमध्येही दिला जाईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:33 PM 29-Sep-21