महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मुंबईत पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानपर्यंत विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चानंतर मुंबई पालिसांनी मनसेच्या मदतीने कारवाई सुरू केल्याच दिसत आहे. दहशतवाद विरोधी पथक व मानवी तस्करी विरोधी शाखेने कारवाई करून 23 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याबाबतची माहिती मनसेच्या स्थानिक शाखेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं समजतंय.
