पावस तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संतोष सामंत यांची निवड

0

रत्नागिरी : पावस ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संतोष मधुसूदन सामंत यांची एकमताने निवड झाली. एक हुशार व जाणकार व्यक्तीची निवड झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सन २००८ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन झाल्यापासून गावातील विविध प्रकारचे तंटे मिटवण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात आले. या समितीचे गावपातळीवरील कामाचे योग्य मूल्यमापन व्हावे व गावाला तंटामुक्त करावे, या प्रमुख हेतूने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी सामंत यांची निवड करण्यात आली. संतोष सामंत यांनी अनेकवर्ष भारत संचार निगममध्ये उत्कृष्ट सेवा करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच ते पावस येथील ग्रामसुधारक सेवा समिती या संस्थेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी, श्री देवी नवलादेवी या देवस्थान समितीच्या खजिनदारपदी कार्यरत आहेत. निवडीनंतर सामंत म्हणाले की, गावातील ग्रामस्थांनी एकमताने माझी निवड केली आहे, ती निवड सार्थ करण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच गावातील प्रलंबित असलेले दिवाणी व इतर तंटे कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्व सदस्यांच्या सहकार्यान मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. गाव तंटामुक्त करण्याचा प्रयत्न राहणार असून गावाला तंटामुक्त गाव समितीचे बक्षीस मिळविण्याचा इरादा असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:12 PM 30-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here