राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होत होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावं चर्चेत असताना मात्र, भाजप नेतृत्ताने चंद्रकांत पाटलांवर पुन्हा विश्वास दाखवत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच आमदार मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याबाबतची घोषणा केली आहे.