गांधी जयंतीनिमित्त वारसा स्थळे व पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे व वारसा स्थळांच्या ठिकाणी व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा व निसर्गाची देणगी लाभलेली असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये विपुल प्रमाणात वारसास्थळे तसेच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व वारसा स्थळांचे आणि पर्यटन स्थळांचे संवर्धन करणं हे एक सुजाण नागरिक म्हणून आपलं आद्यकर्तव्य आहे. 2 ऑक्टोबर रोजी दिवसभरामध्ये जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, वारसा स्थळ ठिकाणी व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. यासाठी त्या-त्या ठिकाणचे मुख्याधिकारी, गावातील ग्रामसेवक, तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी या सर्वांसोबत समन्वय साधून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही मोहीम आपल्याला राबवावयची आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे आणि ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 01-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here