राजापूर : राजापूर तालुक्यातील बहुचर्चित ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ७ कोटी ४४ लाख रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दिली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबा घाट घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग बंद अवजड वाहनांसाठी आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटातून वाहतूक वाढली आहे. त्यामुळे सध्या ओणी-पाचल-अणुस्कुरा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतुकीचे प्रमाण पाहता फक्त खड्डे भरून रस्त्यार्च दुरूस्ती होणे कठीण बनले आहे. त्यामुळे विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार हुस्नबान खलिफे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे करून बांधकाम विभागाने तयार केलेला प्रस्तावही सादर केल होता. या पार्श्वभूमीवर सौ. खलिफे यांनी नुकतीच बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे या रस्त्यासाठी विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत ७ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याचे खलिफे यांनी सांगितले. त्यामुळे ओणी-पाचल-अणुस्कुर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच खलिफे यांच्या प्रयत्नाने नाटे, आंबोळगड, गोंदीवणे येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांनाही ना. चव्हाण यांनी मंजुरी दिल्याचे खलिफे यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 01-Oct-21