बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी देऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. यावर आता ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांनी आक्षेप आहे. कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मग ७ दिवसांचा पगार कशासाठी ? असा सवाल कडू यांनी विचारला आहे.