रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ ३९ टक्के शेतकऱ्यांनी पीककर्ज योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७८५ शेतकरी पंतप्रधान किसान योजनेसाठी पात्र आहेत. सर्व व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून ५८ हजार ५८७ लाभार्थी शेतकऱ्यांनी पीककर्ज पुरवठा घेतला आहे.
