राजापूर : तालुक्यातील ओशिवळे येथील वाघू यांच्या विहिरीत सुमारे ९ ते १० फूट असलेल्या भल्या मोठ्या अजगराला राजापूर वन विभागाने बाहेर काढून जीवदान दिले. शनिवारी सकाळी विहिरीमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. विहिरीत काय पडले म्हणून वाघू यांचा मुलगा अब्दुल याने विहिरीत डोकावून पाहिले असता भला मोठा अजगर त्याच्या निदर्शनास आला. त्याने आई-वडिलांना विहिरीत अजगर पडल्याचे सांगितले. त्यावेळी वाघू यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर यांना फोन करून सांगितले. आडिवरेकर यांनी राजापूर वन खात्याला कळविले. दरम्यान, वनविभाग अधिकारी गावडे आपली टीम व सर्पमित्र प्रकाश नाचणेकर यांना घेऊन ओशिवळे येथे दाखल झाले. त्यानंतर येथील ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्नांनी नाचणेकर यांनी अजगराला विहिरीबाहेर काढले. अजगराचे वजन सुमारे ३० ते ३५ किलो असल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. अजगर विहिरीतून बाहेर काढल्याने वाघू कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. वन विभाच्या टीमने अजगराला निर्जनस्थळी सोडून त्याला जीवदान देण्यात आले. यावेळी दीपक म्हादये, प्रथमेश म्हादये उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 04-Oct-21